Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

कर्ज मंजूर करून नंतर रद्द केल्याने बँकेवर ग्राहक आयोगाची कारवाई

यवतमाळमध्ये मंजूर कर्ज अचानक रद्द केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला ग्राहक आयोगाने दिलासा दिला असून बँकेला नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे.

07 May, 20251 min readविदर्भ
कर्ज मंजूर करून नंतर रद्द केल्याने बँकेवर ग्राहक आयोगाची कारवाई

कर्ज मंजूर करून नंतर रद्द केल्याने बँकेवर ग्राहक आयोगाची कारवाई

यवतमाळ जिल्ह्यातील अशोक गुलाबचंद भुतडा या शेतकऱ्याने शेतीसाठी बँक ऑफ इंडिया येथील दत्त चौक शाखेकडे ८.५ लाख रुपयांचे कर्ज मागितले होते. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज मंजूर करण्यात आले. या मंजुरीनंतर शेतकऱ्याने विहीर पुनर्बांधणी, सपाटीकरण व लागवडीसाठी स्वतःच्या खिशातून ३.६५ लाख रुपयांचा खर्च करून काम सुरू केले. मात्र, त्यानंतर बँकेने कोणतीही स्पष्ट कारणे न देता कर्ज वितरीत करण्यास नकार दिला, ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.

 

या अन्यायाविरुद्ध अशोक भुतडा यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मराठे आणि सदस्य अमृता वैद्य यांच्या खंडपीठाने बँकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत निर्णय दिला. आयोगाने बँक ऑफ इंडियाला ८.५ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्याचे आदेश दिले, तसेच २० हजार रुपये मानसिक त्रास आणि १० हजार रुपये तक्रार खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले. हे रक्कम ३० दिवसांत न दिल्यास आठ टक्के वार्षिक व्याजही आकारण्यात येईल.

 

बँकेकडून केवळ तोंडी सूचना देण्यात आल्याचा दावा केला गेला होता, मात्र लेखी पुरावा नसल्याने आयोगाने तो युक्तिवाद फेटाळला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक सकारात्मक उदाहरण उभे राहिले असून बँकिंग प्रक्रियेत पारदर्शकतेची गरज अधोरेखित झाली आहे.

Share this article: