Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

7 hours ago1 min readमहाराष्ट्र
राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र राज्यात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ह्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

हवामान विभागाने २२ ते २४ मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि परिसरात २३ मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढू शकते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

आज, २३ मे रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात २६ वर्षानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

Share this article: