Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

कल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणी

कल्याण इमारत दुर्घटनेतील बेघर रहिवाशांचे पालिकेकडे पुनर्वसनासाठी मागणी. तात्पुरती निवार्याची सोय, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी.

7 hours ago1 min readमहाराष्ट्र
कल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणी

कल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणी

कल्याण पूर्वेकडील चिकणी पाड्यात सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे (KDMC) धाव घेतली आहे. गुरुवारी पालिका प्रशासनाला भेटून त्यांनी तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली. दुर्घटनेतील पीडितांनी पालिका प्रशासनाकडे आपली व्यथा मांडताना, 'आमचा संसार उध्वस्त झाला असून, तो पुन्हा उभा करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी,' अशी आर्त विनंती केली.

 

या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. इमारतीमधील सुमारे ५० कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. सध्या या बेघर नागरिकांसाठी नूतन विद्यामंदिर शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, शाळा लवकरच सुरु होणार असल्याने त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारत दुर्घटनेतील एक रहिवासी आणि इमारतीच्या सेक्रेटरी रेखा पाठारे म्हणाल्या, 'आम्ही इथे मोर्चा काढण्यासाठी नाही, तर पालिकेला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. तात्पुरती सोय म्हणून शाळेत आसरा मिळाला आहे, परंतु शाळा सुरु झाल्यावर आम्ही कुठे जायचे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

पाठारे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही आपले मत व्यक्त केले. ' सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे, ती लवकरात लवकर मिळावी. तसेच, दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा,' अशी मागणी त्यांनी केली. पालिका आयुक्त अभिनव गोयल हे शहर बाहेर असल्याने, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी नागरिकांची भेट घेतली आणि आयुक्तांसोबत शुक्रवारी दुपारी १ वाजता बैठक निश्चित केली. आपल्या भावना व्यक्त करताना पाठारे यांना अश्रू अनावर झाले. ' अनेक वर्षांपासून जमवलेला संसार १५ मिनिटांत कसा बाहेर काढायचा? ', असा सवाल त्यांनी केला.

Share this article: