Batmi24
Latest:
कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?

पृथ्वीराज चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका, गुंतवणूक संकट व खंडणीखोरीमुळे बेरोजगारी वाढत असल्याचा गंभीर आरोप

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर खंडणीखोरीला राजाश्रय दिल्याचा आरोप करत गुंतवणूक व रोजगाराच्या संधींवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याची भूमिका मांडली.

30 Apr, 20251 min readराजकारण
पृथ्वीराज चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका, गुंतवणूक संकट व खंडणीखोरीमुळे बेरोजगारी वाढत असल्याचा गंभीर आरोप

पृथ्वीराज चव्हाण यांची राज्य सरकारवर टीका, गुंतवणूक संकट व खंडणीखोरीमुळे बेरोजगारी वाढत असल्याचा गंभीर आरोप

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील उद्योग व गुंतवणुकीच्या स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील फक्त सहा जिल्हे वगळता इतरत्र उद्योजक गुंतवणुकीस तयार नाहीत, कारण खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परिणामी राज्यात रोजगारनिर्मितीवर गंभीर परिणाम झाला आहे.

 

चव्हाण यांच्या मते, उद्योगधंद्यात अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य सध्या मागे पडले असून, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांतूनच राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा येतो. अन्य जिल्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने समतोल प्रगती होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खंडणीखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच “लाडकी बहीण” योजनेच्या नावाखाली निधीचा अपव्यय होत असल्याने सरकार आर्थिक संकटात सापडले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

 

जातनिहाय जनगणनेबाबत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत मनमोहन सिंग सरकारच्या काळातच याची सुरुवात झाल्याचे सांगितले. तसेच जागतिक व्यापारातील भारताच्या सहभागावर भाष्य करताना त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आणि भारत सरकारने विरोधकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.

Share this article: