Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

राष्ट्रवादीतील गट पुन्हा एकत्र येणार? पवार कुटुंबीयांच्या भेटींमुळे चर्चेला उधाण

शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

09 May, 20251 min readराजकारण
राष्ट्रवादीतील गट पुन्हा एकत्र येणार? पवार कुटुंबीयांच्या भेटींमुळे चर्चेला उधाण

राष्ट्रवादीतील गट पुन्हा एकत्र येणार? पवार कुटुंबीयांच्या भेटींमुळे चर्चेला उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या वाटेने गेलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अलीकडच्या काळात झालेल्या वारंवार भेटींमुळे पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय चर्चेला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने चांगले यश मिळवले, तर शरद पवारांच्या गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे दोन्ही बाजूंमधील कार्यकर्त्यांमध्ये एकसंघ होण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी या पार्श्वभूमीवर स्पष्ट केलं की, पुढील निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल. त्याआधी साहेबांची (शरद पवार) भेट घेणे आवश्यक आहे. ‘आमचे आठ खासदार उत्तम काम करत असून, कोणताही निर्णय एकत्र घेण्यात येईल,’ असंही त्यांनी सांगितलं. तसेच देश हे प्रथम असल्यामुळे तातडीचे निर्णय सध्या टाळण्यात येत आहेत.

 

दरम्यान, साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पवार कुटुंबातील नेत्यांमध्ये हास्यविनोद आणि आपुलकीने झालेली चर्चा पाहून, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनीदेखील संभाव्य एकत्रिततेबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली असून, “विचारधारा एकच असल्यामुळे भविष्यकाळात गट एकत्र येतील, याचे आश्चर्य वाटणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले.

Share this article: