Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

30 मे ते 1 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

देशभरात उष्णतेची लाट आणि वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सून केरळमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

07 May, 20251 min readदेश
30 मे ते 1 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

30 मे ते 1 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

देशात सध्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत असून, काही भागांत उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचे प्रमाण दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यावर्षी उष्णतेची लाट तब्बल 50 दिवसांपेक्षा अधिक काळ सक्रिय होती, त्यामुळे बंगालच्या उपसागरातील आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले असून, यंदा मान्सून लवकरच अंदमानच्या सागरात 20 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.

 

त्यानंतर 30 मे ते 1 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून लवकर दाखल होणे हे देशातील अनेक भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही पाण्याचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत लवकर येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो.

 

दरम्यान, महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदल होत असून, गेल्या 24 तासांमध्ये काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील 4 ते 5 दिवस हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच मुंबई, ठाणे, पालघर येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागांत गारपीटही होण्याची शक्यता आहे.

Share this article: