Batmi24
Latest:
कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणनेला मंत्रिमंडळाची मान्यता, राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रिया

केंद्र सरकारने अखेर देशात जातनिहाय जनगणना करण्यास मंजुरी दिली असून विविध राजकीय पक्षांनी याचे स्वागत करतानाच काहींनी सरकारवर टीकाही केली आहे.

30 Apr, 20251 min readदेश
केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणनेला मंत्रिमंडळाची मान्यता, राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रिया

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणनेला मंत्रिमंडळाची मान्यता, राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रिया

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या जनगणनेला अधिकृत मान्यता देण्यात आली. या निर्णयाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांकडून यासंबंधी मागणी सुरू होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आलेला निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

या निर्णयाचे स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीकाही केली. त्यांनी म्हटले की, “बहुमत असलेल्या सरकारने आजवर हा निर्णय टाळला, मात्र आता टेकू असलेल्या सरकारमुळे निर्णय घेण्यास भाग पाडले गेले.” त्यांनी आशा व्यक्त केली की, या जनगणनेमुळे राज्यातील विविध जातीय समूहांशी संबंधित प्रलंबित आरक्षण प्रश्न मार्गी लागतील. त्याचबरोबर, अल्पमतातील सरकाराचे महत्त्व यातून अधोरेखित होते, असेही त्यांनी नमूद केले.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, “जातनिहाय जनगणना ही सामाजिक समतेसाठी आवश्यक असून यामुळे धोरणात्मक निर्णय घेणे अधिक प्रभावी होईल.” त्यांनी या निर्णयामुळे देशातील समतेचा विचार बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. एकूणच, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

Share this article: