Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

जातनिहाय जनगणनेवरून राहुल गांधी आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई तीव्र, अमित मालवीय यांनी दिले पत्राद्वारे प्रत्युत्तर

केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपामध्ये श्रेयवादावरून वाद उफाळून आला असून भाजपाने २०१० मधील पत्राचा दाखला देत प्रत्युत्तर दिले आहे.

30 Apr, 20251 min readराजकारण
जातनिहाय जनगणनेवरून राहुल गांधी आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई तीव्र, अमित मालवीय यांनी दिले पत्राद्वारे प्रत्युत्तर

जातनिहाय जनगणनेवरून राहुल गांधी आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई तीव्र, अमित मालवीय यांनी दिले पत्राद्वारे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारला तारीख जाहीर करण्याची मागणी केली असून, त्यांनी यामागे काँग्रेसच्या दीर्घकालीन लढ्याचे श्रेय दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने उशिरा का होईना, योग्य निर्णय घेतला असला तरी जनगणना कधी सुरू होणार व अंतिम अहवाल कधी सादर होणार, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.

 

या विधानांवर भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी २०१० मध्ये दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना लिहिलेले पत्र शेअर करत, भाजपाने जातीय जनगणनेला पाठिंबा दिला होता, हे दाखवले. मालवीय यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, २०११ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने सामाजिक-आर्थिक जनगणना केली खरी, पण जातीय माहिती सार्वजनिक करण्यात अपयश आले. गांधी कुटुंबावर त्यांनी मागासवर्गीय विरोधाचा आरोपही केला.

 

या पार्श्वभूमीवर, जातनिहाय जनगणना ही राजकीय श्रेयाच्या पलीकडे जाऊन सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या निर्णयावर आपले राजकीय योगदान अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला दिले जात असून, हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Share this article: