Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात एसआयटी अपयशी ठरल्यानाने उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी आणि अवमान कारवाईची शक्यता

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात आरोपीच्या मृत्यूनंतरही जबाबदार पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न झाल्याने उच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून एसआयटीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

01 May, 20251 min readमुंबई
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात एसआयटी अपयशी ठरल्यानाने उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी आणि अवमान कारवाईची शक्यता

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात एसआयटी अपयशी ठरल्यानाने उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी आणि अवमान कारवाईची शक्यता

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीत झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांविरोधात अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने क्राइम ब्रँच एसआयटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे प्रकरण गंभीर मानत ‘ही दुर्दैवी बाब’ असल्याचे म्हटले आणि पोलिसांच्या वागणुकीवर कठोर शब्दांत टीका केली.

 

या प्रकरणात पोलिस निरीक्षक मंगेश देसाई हे तक्रारदार राहणार असून, ते संबंधित कागदपत्रांचे परीक्षण करून ३ मेपर्यंत गुन्हा दाखल करतील, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी दिली. मात्र, न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल न करणे म्हणजे न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन असून, त्यामुळे अवमान कारवाई अपरिहार्य ठरू शकते. खंडपीठाने एसआयटीकडून अधिक जबाबदारी आणि समर्पण अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.

 

७ एप्रिल रोजी न्यायालयाने सह आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा मृत्यू अनैसर्गिक आहे आणि मृतदेह उपलब्ध आहे, तेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी आणखी काय पुरावे आवश्यक आहेत? पोलिसांवरील विश्वास कमी होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने कारवाई करणे आवश्यक आहे.

Share this article: